Tuesday, October 7, 2008

Thursday, September 25, 2008

मराठी पाट्यांसाठी राजचा वॉर्निगबोर्ड

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील दुकानादारांना दुकानांवर मराठी पाट्या लावण्याच्या २८ ऑगस्टच्या डेड लाइनला केवळ सात दिवस शिल्लक असल्याचे फलक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दादर भागात लावले.
महाराष्ट्रातील विशेषतः मुंबईतील दुकानांवर मराठी पाट्या २८ ऑगस्टच्या आत लावाव्यात नाही तर वेगळ्या भाषेत सांगण्यात येईल, असा इशारा राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यांच्या या इशा-याची आठवण करून देण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दादर परिसरात 'फक्त सात दिवस शिल्लक' अशा आशयाचे फलक ठिकठिकाणी लावले आहे.
दुकानाच्या पाटीसाठी पाच हजाराचा खर्च येईल, पण मराठी पाटी लावली नाही तर मग परिणामांना दुकानदारांनी सामोरे जावे. पाटीसाठी खर्च करावा की दुकानासाठी हे दुकानदारांनीच ठरवावे, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.
नेत्याच्या चेतावणीची आठवण करून देण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आणि त्यांनी फलक लावण्याचे काम सुरू केले आहे.

Saturday, September 20, 2008

बच्चन कुटुंबियांविरुद्ध राज'बंदी' मागे

जया बच्चन यांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेले वादळ क्षमवण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी मागितलेल्या जाहीर माफीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बच्चन कुटुंबियांविरुद्धचे आंदोलन मागे घेतले आहे.

जया बच्चन यांनी आपल्या वक्तव्यावर स्वतः माफी मागणे आवश्यक होते. मात्र, कुटुंब प्रमुख म्हणून अमिताभ बच्चन यांनी महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची माफी मागितली. याचा आम्ही आदर करतो आणि बच्चन कुटुंबियाविरुद्धचे आंदोलन मनसेने मागे घेत आहेत, असे राज ठाकरे यांनी मनसेचे मुख्यालय असलेल्या राजगड येथे आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केले.

भाषणबंदीनंतरही राज ठाकरे यांनी अमिताभ बच्चन यांच्या माफीवर भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या संदर्भात भूमिका मांडण्यासाठी त्यांनी मुंबई पोलिस आयुक्त हसन गफूर यांच्याकडे पत्रकार परिषदेची परवानगी मागितली होती. मात्र, चौकशीनंतर परवानगी देण्यात येईल असे सांगितले. त्यानुसार राज ठाकरे यांनी शिवाजीपार्क स्टेशनमध्ये अर्ज करून पत्रकार परिषदेची मागणी केली होती.

अमिताभ बच्चन यांनी मागितलेली माफी ही मराठी माणसाच्या एकजूटीचा विजय आहे. मराठी माणूस एकत्र आल्यावर काय करू शकतो याचं हे छोटंसं उदाहरण आता जगासमोर आहे. अमिताभ बच्चन हे ज्येष्ठ कलाकार आहे. अमिताभ बच्चन, लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांना सीमा नाहीत. यांनी आपल्या राज्यांच्या सीमेत बांधून घेवू नये, असा आग्रहही राज ठाकरे यांनी यावेळी केला.

अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगवर जाहीर माफी मागितल्यानंतरही मनसेच्या कार्यकर्त्यांनी जूहूचे पीव्हीआर सिनेमागृह तोडले असे वृत्त प्रसिद्ध झाले. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, ब्लॉग नावाची गोष्ट म्हणजे वर्तमानपत्र किंवा न्यूज चॅनल नाही. सकाळी उठल्यावर माणूस अमिताभ यांचा ब्लॉग वाचणार असे होत नाही. अमिताभ बच्चन यांनी काल सायंकाळी पत्रकार परिषद घेतल्यानंतर सर्व गोष्टी क्लीअर झाल्या. त्यामुळे आता मनसेने सुरू केलेले आंदोलन आम्ही मागे घेत आहोत. कार्यकर्त्यांना शांतता राखावी असे आवाहन त्यांनी यावेळी केली.

Wednesday, September 17, 2008

पाट्या महाग की, दुकाने ते ठरवा!

मराठी भाषेतल्या पाट्या महागड्या असल्याचा युक्तिवाद मॅकडोनाल्डसारख्या कंपन्या करतात. पण पाट्या महागड्या की, दुकाने महागडी याचा विचार दुकानदारांनी करावा. मराठी भाषेत पाट्या लावल्या नाहीत, तर त्यांचे परिणाम भोगायची तयारी ठेवा, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी दिला. मराठी भाषेवर आक्षेप असेल तर तो महाराष्ट्रदोह ठरेल, असे ते म्हणाले.

मराठीत पाट्या लावण्यासाठी मनसेेने दिलेली मुदत २८ ऑगस्टला संपत आहे. मराठी पाट्यांसाठी दिलेली मुदत व भोईवाड्यातील गावठाणाच्या विकासाच्या मुद्यावर राज यांनी पालिका आयुक्त डॉ. जयराज फाटक यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत आमदार बाळा नांदगावकर, मंगेश सांगळे, अरविंद गावडे होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राज म्हणाले की, मराठीतल्या पाट्या म्हणजे दुकानाच्या नावाचा अनुवाद नाही, असे स्पष्ट करताना ते म्हणाले की, देवनारी लिपीमध्ये पाट्या असल्या पाहिजेत. भाजपचे सरकार असलेल्या कर्नाटकमध्ये कन्नड येत नाही म्हणून मराठी आमदाराला मंत्रिपदापासून लांब ठेवले जाते. भाषेबद्दलचा प्रश्न इतर राज्यात विचारला जात नाही. चेन्नईमध्ये बीएमडब्ल्यू कपंनीत आलेल्या परदेशी तंत्रज्ञाना तामिळ भाषा शिकावी लागते. इतर राज्यांत भाषेच्या प्रश्नावर कोणीही ब्र काढत नाही. मराठी सोडून अन्य भाषांना सामावून घेण्याचा मक्ता काय महाराष्ट्रानेच घेतला आहे काय, असा सवाल त्यांनी केला.

Monday, September 15, 2008

पैशासाठी आपलेच घुसवताय परप्रांतियांनाः राज ठाकरे

पुण्याच्या आजूबाजूला ज्यांनी हजारो एकर जमीन घेतली आहे. त्यांना परप्रांतीय विद्यार्थ्यांचा ज्यांना पुळका सुटला आहे. आपल्या जमिनी विकण्यासाठी त्यांना उप-यांची मदत होते. शिक्षणासाठी आलेला राज्यात आलेला आपलं कायमचं बस्तान येथं बसतो. पैशासाठी आपलेच अशा परप्रांतियांना घुसवत असल्याचा टोला शरद पवार यांचं नाव न घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मारला.

मराठी विद्यार्थ्यांना शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशात प्राधान्य मिळावे यासाठी मनसेने गेल्या आठवड्यापासून ४६ शिक्षण संस्थाविरोधात आंदोलन पुकारले आहे. त्या विषयी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी राज ठाकरे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

आपल्या लोकांमुळे यापूर्वी मुंबईची वाट लागली आहे. आता पुणे, नाशिक आणि औरंगाबाद या शहरांची वाट लागणार आहे. जो तरुण शिक्षणासाठी महाराष्ट्रात येतो. त्याला कॅम्पस इंटरव्हूवद्वारे इथेच नोकरी मिळते. नोकरी मिळाल्यावर घर विकत घेऊन तो इथचं आपलं बस्तान मांडतो. हजारो एकरमध्ये उभारलेल्या आपल्या स्कीम खपवण्यासाठी या परप्रांतीयांचा उपयोग होतो. त्यामुळे याला सर्वस्वी आपले माणसे जबाबदार असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला.

परप्रांतीय विद्यार्थ्यांमुळे राज्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते, या मुद्याला हात घालत राज ठाकरे म्हणाले, शिक्षणाचा धंदा करायचा असेल तर काढा, महाराष्ट्राचं ग्लोबल टेंडरच काढा ! मागासलेल्या राज्यातली म्हणून जे विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी येतात ते ४० ते ५० लाख रुपये डोनेशन भरून प्रवेश घेतात. त्यावेळी हा पैसा कुठू आणला आहे. याची साधी चौकशीसुद्धा केली जात नाही. पाटणा आणि लखनौ मध्ये तर येथील शिक्षणाच्या धंद्याच्या पाट्या लावल्या जातात.

आता अॅडमिशनची लिस्ट जाहीर होण्याची वाट आम्ही पाहत आहोत. लिस्टमध्ये जर मराठी मुलांना प्राधान्य दिले नाही तर पुन्हा मनसे तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

पुण्याच्या एमआयटी कॉलेजमध्ये मनसेचा राडा

परप्रांतीय विद्यार्थांच्या मुद्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुण्याच्या पौड रोडवर असलेल्या एमआयटी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये राडा केला आहे. स्थानिक मराठी विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक प्रवेश नाकारला जात असल्यामुळे हा पर्याय वापरावा लागला असे मनसेचे म्हणणे आहे.

महाराष्ट्र सरकारने स्थानिक विद्यार्थ्यांना प्रवेश देताना प्राधान्य द्या असे सांगितले असतानाही एमआयटी स्थानिक विद्यार्थ्यांना प्रवेश देणे टाळते. यासंदर्भात वारंवर निवेदने देऊनही एमआयटीचे प्रशासन त्याकडे लक्ष देत नव्हते. असा आरोप करत मनसेच्या कार्यकर्त्यांना एमआयटीच्या आवारात दगडफेक केली. तसेच संस्थेचे संचालक मंगेश कराड यांच्या केबिनमध्ये घुसून तिथेही बरीच तोडफोड करण्यात आली.

राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या सभेमध्ये परंप्रातीय विद्यार्थ्यांचा मुद्दा उचलून धरला होता. स्थानिक विद्यार्थ्यांना प्रवेश देताना डावलल्यास कॉलेज व्यवस्थापनाला त्याचे परिणाम भोगावे लागतील , असा इशाराही त्यांनी त्यावेळी दिला होता. तरीही एमआयटी कॉलेज मोठ्या प्रमाणावर राज्याबाहेरुन आलेल्यांना प्रवेश देत होते. असे मनसेच्या नेत्यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

या प्रवेश प्रकाराबाबत मनसेने कॉलेज व्यवस्थापनाकडे माहिती मागितली होती. तसेच राज्याबाहेरच्या मुलांना प्रवेश देणे थांबवावे अशी निवेदनही दिली होती. मात्र त्याकडे कॉलेज व्यवस्थापनाने दुर्लक्ष केले म्हणून अखेर कॉलेज प्रशाननाला जाग आणण्यासाठी हा मार्ग निवडावा लागला , एमआयटीचे व्यवस्थापन पैसे घेऊन परप्रांतातील मुलांना प्रवेश देते आणि राज्यातील लायक विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारत आहे , असा आरोपही मनसेने केला आहे.

११ जुलैनंतर काय

११ जुलैनंतर काय होतंय बघा!- राज
मुंबई,
मटा ऑनलाइन वृत्त

‘ आज मी शांत आहे, असं अनेकांना वाटत असेल... पण ही वादळापूर्वीची शांतता आहे... ११ जुलैनंतर काय होतंय बघा... ’ असा गर्भित इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.

मुंबईत बोरिवलीला आयोजित एका कार्यक्रमासाठी राज ठाकरे उपस्थित होते, तेव्हा त्यांचं फक्त आठ मिनिटांचं भाषण झालं. पण त्यातून त्यांनी पुढच्या राड्याचेच संकेत दिले आहेत.

राज यांनी अपेक्षेप्रमाणे मराठीचा मुद्दा उचलला. उत्तर भारतीयांची खुमखुमी अजून गेलेली नाही. त्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवावी लागेल, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. राज ठाकरे शांत झाला, नुसतं बोलून काय होणार, कृती केली पाहिजे, असं अनेकजण बोलत आहेत. पण ही वादळापूर्वीची शांतता आहे. ११ जुलैनंतर बरंच काही होणार आहे, त्यामुळे तोपर्यंत वाट पाहा, असं त्यांनी सूचित केलं.

असाच इशारा राज ठाकरेंनी ३ मेच्या शिवाजी पार्कच्या सभेपूर्वी दिला होता. त्या सभेनंतर मनसे कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांना सळो की पळो करून सोडलं होतं. त्यामुळे आता ११ जुलैनंतर राज काय करणार, याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.

मुखपत्र काढायचंय !
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं मुखपत्र काढण्याचा विचारही राज यांनी यावेळी बोलून दाखवला. मुखपत्र काढायची तयारी सुरू केल्याचंही त्यांनी बोलता बोलता सांगितलं. मुखपत्राच्या माध्यमातून रोजच्या रोज कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचणं शक्य होईल, असा त्यांचा विचार आहे.

Friday, September 12, 2008

स्वातंत्र्यदिनापासून सदस्यनोंदणी

येत्या १५ ऑगस्टपासून एक महिना राज्यभर मनसेची सदस्यनोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठीच्या फॉर्मचं वितरण आज कार्यकर्त्यांना करण्यात आलं. ज्याला मनसेमध्ये यायचंय त्याला येऊ द्या, त्यातल्या गुणदोषांसह स्वीकारा, असं आवाहन राज यांनी कार्यकर्त्यांना केलं.

Thursday, August 14, 2008

मराठी पाट्यांसाठी राजची २८ ऑगस्टची 'डेडलाइन'

' दुकानांवर मराठी पाट्या लावण्याची माझी मुदत १४ ऑगस्टला संपतेय... पण मुंबई महापालिकेचे आयुक्त जयराज फाटक यांनी २८ ऑगस्टपर्यंत मुदत दिलेय... म्हणून मीही २८ ऑगस्टपर्यंत थांबणार आहे.... म्हणून आता उरलेल्या दिवसांत, पाट्या बदलणं महाग पडतं की दुकान महाग आहे, याचा विचार ज्याने-त्याने करावा ' , असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिला.

मराठी माणसाने मान खाली घालता कामा नये. ' भय्यां ' ना निवेदनाची भाषा कळत नाही, त्यांना चेपलंच पाहिजे, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

मनसेच्या वतीनं आज नेत्रदानाचे २५ हजार फॉर्म पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडे सोपवण्यात आले. त्यानंतर राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्याला हात घातला आणि परप्रांतियांना टार्गेट केलं.

महाराष्ट्रात प्रत्येक दुकानावर मराठी पाट्या लागल्या पाहिजेत, हा मुद्दा आपल्या स्वाभिमानाचा आहे. मी १४ जुलैला सगळ्यांना एक महिन्याची मुदत दिली होती. पण मुंबई महापालिकेनं २८ जुलैला तसा फतवा काढलाय. त्यांची मुदत संपेपर्यंत मी वाट पाहणार आहे, आणि नंतर जे पत्रात लिहिलंय तेच होईल, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. पाट्या बदलणं महाग की दुकान जास्त महाग, हे प्रत्येकानं ठरवावं, असं सांगून आपल्या आंदोलनाची दिशाही त्यांनी स्पष्ट केली. निवेदनं देऊन, थंडपणे सांगून हे ऐकणार नाहीत. त्यांना काठ्यांचीच भाषा कळते, असंही त्यांनी सुनावलं.

महाराष्ट्र काय बापाचा माल आहे का ? ही आपली जमीन आहे. आपण, आपलं अस्तित्त्व, आपली जमीन याबद्दल प्रत्येकानं अभिमान बाळगला पाहिजे, असंही राज यांनी नमूद केलं. खाली मान घालून, हातावर हात घेऊन बसलेला माणूस मला आवडत नाही. अन्याय दिसेल तिथे लाथ मारा, पुढचं मी बघतो, असा आदेशही त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिला. गाफील राहिलात तर पुन्हा पारतंत्र्यात जावं लागेल, असंही त्यांनी सूचित केलं.

शिक्षणसम्राटांवरही राज ठाकरे यांनी हल्लाबोल केला. हे सगळे माजले आहेत. यांच्या पाट्या पाटणा, लखनौमध्ये झळकतात, तिथे त्यांचे दलाल फिरतात आणि मराठी माणसाची वाट लावून हे श्रीमंत होतात, त्यांना अद्दल घडलीच पाहिजे, असा पवित्राही त्यांनी घेतला.

Tuesday, July 15, 2008

मराठी.


┌─●ठेच लागल्यानंतर ज्याच्या तोंडातुन●─┐ ┌─●;आई,ग: आसे उदगार निघतात तो●─┐ माणुस●─┐ ┌─●मराठी.●─┐
┌─●लहान मुलांचे नाव ठेवताना ज्या●─┐ घरातिल●─┐ ┌─●माय,बहिणी शिवाजीचा●─┐ पाळणा म्हणतात ते ┌─●घर मराठी माणसाचें●─┐
┌─●शिव चरीत्र वाचताना ज्याचा उर●─┐ ┌─●अभीमानान भरुन येतो ति छाती मराठी●─┐ ┌─●माणसाची●─┐
┌─●धर्मविर संभाजी महाराजांचे तुरुंगातले●─┐ ┌─●केलेल्या ┌─●छळ,व हालांची कहाणी●─┐ ┌─●वाचताना ज्यांच मन शोक संतप्त होउन●─┐ ┌─●उठत ते मन मराठी मन●─┐

┌─●जय भवानी जय शिवाजी... जय हिंद जय●─┐ ┌─●महाराष्ट्र●─┐............ ..

Rajsahebanchi Press Conference Dtd 14/7/08

राज ठाकरे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुन्हा मराठीचा मुद्दा लावून धरला. मराठीसाठी आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं ते म्हणाले.आता राज ठाकरेंनी आता इंग्रजी शाळांना लक्ष्य केलं आहे त्यांच्याकडे मराठी पहिलीपासून व्हावी यासाठी ते मुंबईसह राज्यातील सगळ्या सीबीएससी आणि आयसीएससी शाळांमध्ये पहिलीपासून मराठी सक्तीची करावी अशा पद्धतीचं पत्र ते पाठवणार आहेत. आणि खासकरून ते पत्र मराठीच छापलं आहे.
तर दुकानांमध्ये मराठीच्या पाट्या सक्तीच्या कराव्या यासाठी सर्व दुकानांना आणि कंपन्यांनाही मी पत्र पाठवणार आहे त्यासाठी राज्यातील सर्व शाळांना ही पत्रकं पाठवली जातील.
आजच्या भाषणातही त्यांनी पुन्हा युपी बिहारला लक्ष्य केलं. युपीमधून येणाऱ्या लोढ्यांवर त्यांनी पुन्हा तोफ डागली. आत्ता 1556 कोटी युपीत गेले आहेत तर महाराष्ट्रातून सर्वात जास्त मनिऑर्डर म्हणजे 82 टक्के मनिऑर्डर युपीमध्ये जातात तर युपीमधून आलेल्या युपी-बिहारींची संख्या म्हणजे 20लाख 72 हजार 193 वर गेली आहे. यासाठी आता सर्व क्षेत्रांमध्ये संघटना स्थापन करणार आहोत तर लोकसभेच्या निवडणुका माझा पक्ष लढवणार आहेच मात्र कोणत्या जागांवर लढणार हे अजूनही निश्चित केलेलं नाही. तर शिक्षणमंत्री पुरकेंवरही त्यांनी समाचार घेतला पुरकेंमुळेच हा सगळा गोंधळ होतो .

Tuesday, June 10, 2008

मी महाराष्ट्रासाठी.... महाराष्ट्र माझ्यासाठी......





मी महाराष्ट्रासाठी.... महाराष्ट्र माझ्यासाठी......
मी ही कविता मा.श्री.राजसाहेब ठाकरे यांच्या मी महाराष्ट्राचा...आणि महाराष्ट्र माझा.....
हया वाक्याला अनसरुन केली आहे.
राजसाहेबाची जी भैय्या लोकांबद्दल जी मोहिम चालु आहे.
त्या मोहिमेस अनसरुन मी ही कविता करण्याचा प्रयत्न केला आहे.
काही जर चुका निदर्षनात आल्यास मला ते सांगुन त्याची क्षमा करावी..
...........ll जय हिंद ll ll जय महाराष्ट्र ll...............

होतो मी शांत आजपर्यंत,
काही नाही बोलो कालपर्यंत,
पण,आजपासुन मी जिवंत असेपर्यंत,
लढणार फ़्कत............!
मराठी माणसासाठी,
हक्काने मागणार.........!
नोक-या मराठी मुलांसाठी,
लोंढे थांबवणार............!
परप्रांतियाचे आपल्या राज्यात येण्यासाठी,
हटवणार.............!
गरिबी मराठी माणसांसाठी,
असच बोलतात.............!
नेते-मंडळी सगळ्यांसाठी,
तन-मन-धन आहे..........!
माझे मराठी बांधवांसाठी,
परप्रांतियाना.............!
त्यांची जागा दाखवुन देण्यासाठी,
झाला,जन्म माझा.............!
हया मातुभुमीसाठी,
घेतला वारसा हक्क.............!
मी मातुभाषेसाठी,
आहे, माझे मराठी बांधव माझ्या पाठीशी,
जे मी बोललो........
तेच मी करणार हया महाराष्ट्रासाठी...
कारण,मी महाराष्ट्रासाठी...
आणि महाराष्ट्र माझ्यासाठी......

........ll जय हिंद ll ll जय महाराष्ट्र ll.............

किरण रामचंद्र मल्लाव..08
@धन्यवाद........!

Monday, June 2, 2008

Times ne ghetli dhakal Online raj samarthakanchi

TIPS FOR RAJ
North Indian bashing nets online support
Mansi Choksi I TNN

Mumbai: MNS chief Raj Thackeray’s north Indian propaganda is not just limited to controversial public rallies. Thackeray and his anti-north Indian stand have found a major following on the internet with several anti-bhaiya online communities on social networking sites and hundreds of other groups which hail the MNS chief as the sole custodian of Maharashtrian culture.
While MNS state secretary Pravin Darekar said that online communities were not part of the party’s pre-planned strategy, he said they were more than welcome because they benefited the cause of the party. “If these online communities are supporting us, we are happy,’’ he said, adding that the online communities were not started by MNS workers.
When told that there were also a few anti-Raj Thackeray communities, Darekar said it did not matter because the number of supporters of the party surpassed them.
While most of the members of the communities are below the age of 40 and are from the city, Navi Mumbai and other parts of Maharashtra, there are also some NRI members.
Some of the members are professionals, some are MBAs and some are students. The membership strength of each of the online groups is anything between a few hundreds to 6,000 users.
Thackeray may have been subject to a gag order to watch his words when in public domain, but there’s no checking on what is being said in these networking sites which can be visited by whoever has a computer and an internet connection. Discussion topics like ‘bhaiya bhagavayche aapale plans’ (plans to get rid of north Indians) evoke plenty of responses like starting Mumbai-Bihar Bhaiyya Bhagao trains to dump north Indians in them by the dozen and pack them off to their homeland, urging the city police to slap north Indians at sight in order to ‘straighten’ them out, destroying paan shops, taxis and autos to curb their source of income and force them to leave the city and making it mandatory for north Indians to only speak in Marathi.
Y P Singh, who had filed a case against the MNS chief in the State Human Rights Commission on behalf of activist Medha Patkar, said there were numerous provisions under law to ensure that anti-communal sentiments were not spread in any medium. “This is nothing but another way of spreading hatred among people. The police should take action under various sections of the Indian Penal Code to curb the spreading of communal sentiments. It can also apply sections of the Information Technology Act to check this kind of unlawful behaviour.’’
Singh added that it was logistically impossible for the police to book offenders because of the vast number of users in each of the online portals and suggested that the police ought to at least book serious offenders to deter others. “There should be some kind of demonstration effect. If one offender is punished, the others will think twice,’’ he said.
However, Mukund Pawar from the Cyber Crime Cell said that these groups were not taken seriously. “We have not received any complaints from anyone,’’ he said, adding that the groups were harmless.

शेव्ठी आपली बातमी त्याना चपावी लागली .....

हा ऑरकुट वर अस्नार्य राज्सम्रथ्कांचा विजय आहे !!!!!

पन आता जरा सम्भालून बोला...तुम्चावर लक्ष आहे सर्वांचा...एक अशी सुरवात कर की कोणाला थम्बवाथा नही अली पाहि जे !!!!

जे कर ते आसा कर की ``सहेबना `` ऊद्य कल्यावर त्याना तुमचा अभिमान वत ला पाहिजे......

मग आता लढा सुरू ठेवा !!!

जय महाराष्ट्र...!!! जय मनसे..!!!


SOURCE
: This ARTICAL FOROM TIMES OF INDIA 29 MAY 2008
ORIGINAL LIKE

http://epaper.timesofindia.com/Default/Client.asp?Daily=TOIM&login=default&Enter=true&Skin=TOI&GZ=T

Sunday, May 4, 2008

राज्साहेबांचे भाषण!!!!!

राजचा हल्लाबोल



राजचा हल्लाबोल

कुठेही मराठी माणसावर अन्याय होताना दिसला तर तुमचं रक्त सळसळलं पाहिजे. माझ्या आदेशाची वाट पाहू नका. अन्याय दिसेल तिथे लाथ मारा. का ? .... तर आपल्याला मराठी माणसांचं भलं करायचं आहे... , असं सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे हल्लाबोलचा आदेश दिला. मराठीच्या मुद्द्यावर आपल्याला विरोध करणा-यांवर थेट हल्ले, प्रक्षोभक भाषा, राज्यभरातून आलेल्या तरुणांची गर्दीचा त्याला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरची दुसरी सभा यशस्वी ठरली.
माझ्या मराठी बंधू, भगिनी आणि मातांनो, अशी सुरुवात होताच भाषणाचा अजेंडा भय्या हाच असणार हे निश्चित झालं. ' उत्तर प्रदेश तो झांकी है , महाराष्ट्र अभी बाकी है ', अशा घोषणा देणा-या भैय्यांची औकात काय ? अडीच हजार मैलावरून येऊन इथे दादागिरीची भाषा करायची नाय... राहायला देतो हेच उपकार समजा.. अबू आझमी , तू २० हजार माणसं आणच , जाताना फक्त ४० हजार पाय जातील. तुमची मस्ती अशीच सुरू राहिली तर शिवाच्या महाराष्ट्राला तिसरा डोळा उघडावा लागेल , असा सज्जड इशाराही त्यांनी दिला आणि मनसे कार्यकर्ते पुन्हा पेटले. भय्या हा शब्द असलेलं प्रत्येक वाक्य टाळ्या घेऊन गेलं.
मराठी भाषेचा आणि मराठी माणसाच्या अस्तित्त्वाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर , जवळपास महिन्यानं राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार असल्यानं त्यात ते काय बोलणार , याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अपेक्षेप्रमाणे त्यांनी मराठी माणूस , मराठी भाषा आणि महाराष्ट्राचं अस्तित्व या भावनिक मुद्यांनाच हात घातला आणि उत्तर भारतीय नेत्यांवर ठाकरी शैलीत टीका केली.
पेटलेला , चवताळलेला आणि स्वाभिमानानं उठलेला मराठी माणूस पाहून शिवरायांनाही आनंद झाला असेल , अशीच आपल्या भाषणाची सुरुवात करून राज यांनी आपल्या कार्यकर्त्यांना खूष केले. त्यानंतर हिंदी आणि इंग्रजी प्रसारमाध्यमांचा साभिनय समाचार घेऊन त्यानं उत्तर भारतीय नेत्यांकडे आपला मोर्चा वळवला. ' यांचा मुंबई-महाराष्ट्र ताब्यात घ्यायचा डाव मी उधळून लावला म्हणून हे चवताळले . असं मी काय बोललो ? चालते व्हा म्हणून बोललोय ? अजून बोललेलो नाही. पण तुमची दादागिरी अशीच सुरू राहिली तर तसंच सांगावं लागेल. आम्हाला काय च्यु... समजला का ? कुणीही यावं आणि टपली मारून जावं..

हे महाराष्ट्र सहन करणार नाही ', असं त्यांनी ठणकावून सांगितलं. अमरसिंग यांचा उल्लेख तर त्यांनी बेडूक , बच्चन कुटुंबाचा प्रवक्ता असा केला. बाटली प्रकरण , जया बच्चन यांचं राज ठाकरेंना ओळखत नसल्याचं वक्तव्य , अमिताभ यांच्याबद्दलची जुनी विधानं , या सगळ्याचाच त्यांनी पंचनामा केला.
राज्यघटना लिहिणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे होते. त्यामुळे आम्हाला कुणी राज्यघटना शिकवण्याचा शहाणपणा करू नये. राहायला देतो हेच उपकार समजा. इथे जे काय मतभेद आहेत, ते आमचं आम्ही बघून घेऊ, असंही त्यांनी सुनावलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५५ साली लिहिलेल्या एका पुस्तकातील उताराच त्यांनी वाचून दाखवला. उत्तर भारताचं वर्चस्व राष्ट्रीय ऐक्याला घातक असल्याचं मत बाबासाहेबांनी त्यावेळी नोंदवलं होतं, मग मी आत्ता काय चुकीचं बोललो, असा सवाल त्यांनी केला, तेव्हा राजच्या जयजयकाराच्या घोषणा घुमल्या. आपल्या सोसायटीच्या मैदानात आपण बाजूच्यांना येऊ देत नाही, मग माझ्या महाराष्ट्राच्या सोसायटीत मी भय्यांना का येऊ देऊ ?, असंही ते म्हणाले. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी १०५ जणांनी हौतात्म्य पत्करलं, ते काय भय्यांच्या गोठ्यात बांधण्यासाठी नाही, असं त्यांनी बजावलं. महाराष्ट्रात फक्त महाराष्ट्र दिनच साजरा होणार, त्यासाठी मला कितीही दिवस तुरुंगात जावं लागलं तरी चालेल, ही गर्जना तर लाखोंच्या जमावानं डोक्यावर घेतली.
मात्र त्याचवेळी, त्यांनी मराठी माणसाच्या मुळमुळीत वृत्तीवरही टीका केली. भुसभुशीत जमिनीतच घुशी होतात. त्यामुळे मराठी माणूस ज्या दिवशी दक्षिणेतल्या माणसाइतका कडवट होईल, आपल्या भाषेबद्दल अभिमान बाळगेल, तेव्हाच त्याचं अस्तित्व टिकू शकेल. असेल हरी तर देईल खाटल्यावरी, असा विचार सोडून द्या. तुम्हाला किती वेळा पेटवायचं. १९२२ साली प्रबोधनकारांनी हेच लिहिलं होतं, ६६ साली बाळासाहेबांनी तेच केलं, आत्ताही हे सगळं मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी चाललं आहे. शिवरायांनी मालोजी घोरपडे यांना पत्र लिहून मराठी सैन्यात सामील होण्यास सांगितलं होतं. मराठीयांचे गोमटे घडवायचे आहे, असं आवाहन त्यांनी केलं होतं. आपल्यालाही आता तेच करायचंय, म्हणून गाफील राहू नका, अन्याय दिसेल तिथे लाथ मारा, असा आदेशच त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

राज ठाकरे ...
महाराष्ट्राचे गोमटे करतील ...

Thursday, May 1, 2008

3 may नवनिर्माण होणारच

हाराष्ट्रात नवनिर्माण होणारच-राज ठाकरे
एक माणुस शिवाजी पार्क खचाखच भरवु शकतो
मित्रहो,
राज ठाकरे - एक धगधगते, बंडखोर व्यक्तिमत्व. पण त्याच्या बंडखोरीला एक वेगळाच सुगन्ध आहे. त्यामधे इतरान्सारखा स्वार्थ इन्चभरही दिसत नाही. अन्याय आणि फ़क्त अन्यायामुळेच शिवसेनेतून बाहेर पडलेल्या या मराठी युवकास मराठी माणसासाठी खरेच काहीतरी मनापासून करण्याची धडपड, उर्मी आहे.

समर्थकान्च्या "आगे बढो, हम तुम्हारे साथ है", या सादेला राजने ओ दिलेली आहे आणि त्याच्या धर्मनिरपेक्ष पक्षाची विजयी घौडदौड सुरूही झालेली आहे.

राजच्या स्वप्नातला महाराष्ट्र सर्वसामान्यान्च्या स्वप्नातल्या महाराष्ट्रापेक्षा वेगळा नक्कीच नसणार, याची आम्हाला खात्री आहे. आणि म्हणूनच मित्रान्नो, महाराष्ट्राच्या नवनिर्माण प्रक्रियेचे उगमस्थान, आशास्थान, श्रध्दास्थान, स्फुर्तीस्थान असलेल्या या अस्सल मराठी युवा नेत्याला आपण खारीच्या वाट्याने का होईना - मदत करू शकतो, नाहीच जमले तर पाठीबा तरी नक्कीच देऊ शकतो.

तोन्ड वाजवुन न्याय मिळत नसेल तर
तोन्डात वाजवुन न्याय मिळवा,
पण न्याय हा झालाच पाहिजे.
एक अस व्यक्तिमत्व कि ज्याची ओळख करुन देण्याची गरज नाहि. अख्खे

Tuesday, March 25, 2008

shiv jayanti

तुताऱ्यांचा निनाद... ढोल-ताशांचा गजर... मंगलमय सूरांची उधळण... छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार... फटाक्‍यांची आतषबाजी... फुलांचा वर्षाव... टाळ्यांचा कडकडाट... अशा वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे महानाट्य आज शिवतीर्थावर साकार झाले. ...
"शतकाच्या यज्ञातून उठली एक केसरी ज्वाला, दहा दिशांच्या हृदयामधूनी अरुणोदय झाला' या काव्यपंक्ती साक्षात उतराव्यात, असा दिमाखदार शिवराज्याभिषेक सोहळा आज शिवाजी पार्क मैदानावर झाला. निमित्त होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या "शिवजयंती उत्सवा'चे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कणखर वाणीतून शिवरायांच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतचा इतिहास उलगडत असताना उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. शिवाजी महाराजांचा जन्म, महाराजांचे बालपण, त्यांच्यावर घडलेले संस्कार आणि हिंदवी स्वराज्यासाठी त्यांनी घेतलेली शपथ हे सर्व प्रसंग शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेल्या कथनातून उपस्थितांसमोर जणु काही चित्रबद्ध झाले. ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या सुमधुर गायनाची याला साथ लाभली. राज्याभिषेक सोहळा "याचि देही याचि डोळा' पाहण्यासाठी शिवाजी पार्कवर जनसागर लोटला होता. शिवाजी पार्कचा कोपरा न्‌ कोपरा हा रोमांचकारी इतिहास डोळ्यात साठविण्यासाठी जनसागराने फुलून गेला होता. राज्याभिषेक सोहळा साकार होताच तुफान, आकर्षक व सप्तरंगी फटाक्‍यांची आतषबाजी झाली. जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणांनी शिवाजी पार्कचा परिसर दणाणून गेला.

"शिवकल्याण राजा' व "शिवराज्याभिषेक सोहळा' याचे भव्य प्रमाणात आयोजन केले होते. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी साकारलेल्या प्रचंड सेटवर हा सोहळा झाला. शिवतीर्थावर उभारलेल्या भव्य २४० फुटांच्या रंगमंचाच्या मध्यभागी भवानी मातेची मूर्ती ठेवण्यात आली होती. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी इतिहासाचे दाखले देत राज्याभिषेक सोहळ्याचा इतिहास कथन केला.

हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा होती, असे शिवाजी महाराजांचे वाक्‍य सांगत आता तुमच्यात आणि आमच्यात अशी इच्छा निर्माण होईल त्याच दिवशी हिंदुस्तान जगभरात महासत्ता म्हणून उदयास येईल, अशी हिंदुत्वाची महती बाबासाहेबांनी उपस्थितांसमोर सांगितली.

हा भव्य सोहळा सर्वांना व्यवस्थित पाहता यावा यासाठी शिवाजी पार्कवर ठिकठिकाणी मोठमोठे स्क्रीन लावण्यात आले होते.
------------------------------------------------------
ज्यांना राग येतो तेच इतिहास निर्माण करतात
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे शिवचरित्र कथन करीत असताना त्यांनी शिवाजी महाराजांच्या काही आठवणी सांगितल्या. तेव्हाचे मराठे आणि आताचे मराठे यांची काहीअंशी तुलना करीत ज्यांना राग येतो तेच इतिहास निर्माण करतात, असा संदेश देत "मनसे'चे मराठी आंदोलन योग्यच असल्याची पावती अप्रत्यक्षरीत्या त्यांनी दिली.
------------------------------------------------------
जयदेव ठाकरे यांची उपस्थिती
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेला शिवराज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी जयदेव ठाकरे आवर्जून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे अनेक मान्यवरांच्या व पत्रकारांच्या भुवया उंचावल्या. पत्रकारांनी त्यांना गाठले असता ते म्हणाले, राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे माझ्यासाठी सारखेच आहेत. त्यामुळे हा भव्य सोहळा पाहण्यासाठी मी उपस्थित राहिलो.
------------------------------------------------------
- शिवराज्याभिषेक सोहळ्याला जनसागर लोटला
- अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे पास असलेले शेकडो जण रांगेत उभे
- उपस्थितांना बसण्यासाठी जागा अपुरी पडल्याने अडथळे काढून व्यवस्था करण्यात आली
- पत्रकारांच्या कक्षातही रसिकांची गर्दी
- "वेडात मराठे वीर दौडले सात' या गीतावर मनसेचे झेंडे हातात घेऊन काही मनसे कार्यकर्ते उपस्थितांमध्ये धावू लागले आणि त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले
- शिवराज्याभिषेक सोहळा होताच मैदानाच्या सर्व बाजूंनी आणि मुख्य व्यासपीठाशेजारी फटाक्‍यांची आतषबाजी

Tuesday, March 18, 2008

Thursday, March 13, 2008

राज ठाकरे.... kahi Photo








माझी भूमिका, माझा लढा!



'' सर्व जग जरी विरोधात गेलं तरी मी आणि माझी संघटना मराठी भाषिक जनता , महाराष्ट्र संस्कृती , मराठी भाषा यासाठीच लढत राहू . यूपी - बिहारवाल्यांची महाराष्ट्रातली दादागिरी आणि गुंडागिरी आम्ही मोडून काढूच . मला महाराष्ट्राच्या मराठी जनतेला एवढंच सांगावंसं वाटतं की , जर मी तुमच्या मनातलंच बोलत असेन तर बघता काय ? सामील व्हा !'' खास ' मटा ' च्या वाचकांसाठी लिहीत आहेत , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे

.....................

मराठी भाषा , मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल बोलल्याबद्दल आणि तिच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरल्याबद्दल यूपी - बिहारमधून आलेल्या गुंडांकडून आणि पत्रकारांचा बुरखा पांघरून यूपी - बिहारची वकिली करणाऱ्या बहुतेक सर्व हिंदी चॅनल्सच्या भय्या पत्रकारांकडून माझी आणि माझ्या सहकाऱ्यांची , माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या संघटनेची सतत बदनामी होते आहे . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी मुलं आणि जे तरुण रस्त्यावर उतरलेले आहेत , ते चांगल्या घरातले आहेत . त्यांची घरची तसेच सांस्कृतिक पार्श्वभूमी अतिशय चांगली आहे . त्यांना उत्तम करीयर्स आणि व्यवसाय आहेत . परंतु तरीही त्यांनी ही बदनामी आणि हा प्रचंड त्रास अंगावर घेतला , ज्यातून त्यांना काहीही आथिर्क किंवा इतर कोणत्याच प्रकारचा फायदा होणार नाही . तात्काळ कोणती सत्तापदंही मिळणार नाहीत . नेता म्हणून आणि एका पक्षाचा अध्यक्ष म्हणून मलाही या साऱ्या संघर्षाचा कोणताच व्यक्तिगत फायदा होणार नाही , हे सारं माहीत असूनही या संघर्षाला मी प्रवृत्त का झालो ?
संपूर्ण महाराष्ट्रातल्या समज असलेल्या जनतेसाठी मी हे लिहीत आहे . महाराष्ट्रात येणाऱ्या यूपी - बिहारमधल्या सर्व भय्यांना आपण इथे महाराष्ट्रात राज्य करण्याकरताच येतो आहे असे वाटत असते . एखाद्या प्रांतातल्या जनतेला तिची स्वत : ची भाषा असते . तिची समृद्ध अशी संस्कृती असते . पाहुणा जेव्हा येतो तेव्हा यजमानाकडून जशी आतिथ्यशीलतेची अपेक्षा असते , तशी पाहुण्याकडून यजमानाच्या घराशी , त्याच्या संस्कृतीशी समरस होण्याची अपेक्षा असते . उत्तर प्रदेश , बिहारमधला साधा माणूस असो , नेता असो , पत्रकार असो , शिक्षणासाठी येणारा विद्याथीर् असो , नट असो , वा मच्छीमार असो - तो तिथे त्या राज्यांमध्ये त्याच्यावर फाके मारण्याची वेळ तिथल्या नेत्यांमुळे आलेली असते म्हणून इथे महाराष्ट्रात येतो - पण इथे आल्यावर त्याची स्टाइल बदलते . इथली भाषा तो शिकत नाही . इथल्या संस्कृतीला , स्थानिक माणसाला तो तुच्छ लेखतो , त्याच्यावर दादागिरी करतो . एखाद्या यूपी - बिहारच्या रिक्षा - टॅक्सीवाल्यापासून ते सिनेमानटांपर्यंत हा अनुभव आपल्याला पुन : पुन्हा येत असतो . आपण आपल्या मराठी संस्कृतीनुसार त्याला उदार सहिष्णूपणे पुन : पुन्हा माफ करतो . विसरून जातो . असं बंगाली , पंजाबी , उडिया , आसामी किंवा तामिळ माणूस कधीही करणार नाही . कारण या भाषिकांची भाषिक आणि सांस्कृतिक उद्दिष्टं अतिशय तीक्ष्ण आहेत आणि त्याबाबत ते सतत सावध असतात . परंतु आपण सहिष्णू आहोत .
आजही सहिष्णुता हा मला गुणच वाटतो . सर्वच अमराठी माणसांशी असा संघर्ष करण्याच्या बाजूचा मी नव्हतो आणि नाही . परंतु यूपी - बिहारमधल्या भय्यांनी हा संघर्ष आमच्यावर लादलेला आहे . सैन्यात मराठा बटालियनमध्ये ' मराठा ' ( म्हणजे महाराष्ट्रीयन ) या शब्दाची फोड ' मरता लेकिन हटता नही वो मराठा ' अशी केली जाते . यापूवीर् हात जोडून या यूपी - बिहारवाल्यांना मी महाराष्ट्रातल्या मराठी माता - बांधवांच्या वतीने अनेकदा सांगितलेलं आहे की , इथल्या संस्कृतीने तुम्हाला सतत खूप दिलेलं आहे , तेव्हा या संस्कृतीचं रक्षण , संवर्धन आणि आदर करणं तुमचं कर्तव्य आहे , असं जाहीर भाषणांत आणि खासगी चर्चांत सांगितलं . परंतु यांची मगुरी इतकी आहे की , उत्तर प्रदेश - बिहारमधून तिथल्या जनतेची पूर्ण वाताहत करून गब्बर झालेले अमरसिंह , मुलायमसिंह आणि तत्सम इतर अनेक नेते इथे बोलावून घेऊन इथल्या मराठी जनतेला राज्यघटना आणि देशप्रेम ' शिकवण्याचे ' प्रयोग इथल्या यूपी - बिहारवाल्यांनी सुरू केले . एवढेच नव्हे , तर हिंदी भाषा आणि हिंदी संस्कृती मुंबई महापालिका आणि महाराष्ट्रावर लादण्यासाठी दादागिरीची भाषा सुरू केली.

महाराष्ट्रातल्या बहुतेकांना खरंतर हिंदी भाषा येतेच . पण मराठी ही इथली राजभाषा आहे . तिला घटनेने राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला आहे . शिवाय , स्वत : ची भाषा - संस्कृती वाढवण्यासाठी आणि अनिवार्य करण्यासाठी भाषावार प्रांतरचना झालेल्या राज्यातल्या जनतेला यूपी - बिहारमधल्या भय्यांची परवानगी घेण्याची गरज आहे का ? या भय्यांनी चक्क मुंबई महापालिकेत हिंदी अनिवार्य करण्याची मागणी करून मराठी मागे रेटण्याचे प्रयत्न सुरू केले . महाराष्ट्रात छट पूजा , उत्तर प्रदेश स्थापना दिवस , राजकीय बळ दाखवण्याकरिता , जोराने साजरे करायला सुरुवात केली . रिक्षा असो , टॅक्सी असो , रस्ते असोत , इमारती असोत , सोसायट्या असोत , वर्तमानपत्रं असोत , चॅनल्स असोत , मच्छिमारी असो , सिनेमे असो - सर्वत्र या यूपी - बिहारवाल्या भय्यांची बेबंद दादागिरी महाराष्ट्रात सुरू झाली . तेव्हा लक्षात आलं की , यांच्याशी हात जोडून बोलण्याचे दिवस संपले . आता यांना हात सोडून सामोरं जायला हवं . म्हणून मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी महाराष्ट्रात यूपी - बिहारवाल्यांच्या सांस्कृतिक व राजकीय दादागिरी आणि गुंडगिरीविरुद्ध संघर्ष सुरू केला . महाराष्ट्रात राहायचं असेल तर महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्रीयनांच्याच जीवनपद्धतीप्रमाणे बाहेरून येणाऱ्यांना जगावं लागेल . महाराष्ट्राशी त्यांना जुळवून घ्यावं लागेल . हे झालं नाही तर महाराष्ट्रात अराजक माजेल .
महाराष्ट्रात जी कायदा - सुव्यवस्था आहे , महाराष्ट्रात ज्या विकासाच्या संस्था आहेत , त्यांचा फायदा देशभरचे लोक घेत असतात . ती संस्कृतीच उखडून टाकली , तर इथे जौनपूर - आझमगढसारखीच परिस्थिती निर्माण होईल . राजाभय्या , अमरसिंह , लालू , पासवानांसारखे लोक महाराष्ट्राचा कब्जा घेतील . हे केवळ मी म्हणतोय असं नव्हे , तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभाध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांनी आमचं आंदोलन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी कोल्हापूरमध्ये ' महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री अमराठी झाले तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही ,' असे उद्गार काढले . आता कुपेकर हे काही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नव्हेत . परंतु ही सार्वत्रिक भावना आहे . मराठी जनतेत , मराठी नेत्यांमध्ये , मराठी नटांमध्ये , सर्व महाराष्ट्राच्या स्वाभिमानी लोकांमध्ये या यूपी - बिहारवाल्यांबद्दल चीड आहे . मी आणि माझा पक्ष फक्त वाईटपणा घेऊन त्यांचं प्रतिनिधित्व करतो . नागड्याला नागडं म्हणण्याचं साहस कुणीतरी सगळ्यांचे शिव्याशाप घेऊन केलं पाहिजे . ते साहस मी करतो आहे . परिणामांची पूर्ण कल्पना करून . एकेकाळी तेच साहस प्रबोधनकारांनी केलेलं होतं . आचार्य अत्र्यांनी केलेलं होतं . बाळासाहेबांनी केलेलं होतं . खुद्द कुसुमाग्रजांनी केलेलं होतं .
कित्येकजण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या आंदोलनाची तुलना शिवसेनेची स्थापना झाली तेव्हाच्या सुरुवातीच्या आंदोलनांशी करतात . परंतु भावना काही प्रमाणात तशीच वाटली तरी दोन्हींमध्ये फरक खूप आहे . तेव्हाचं ते आंदोलन हे गरीब मराठी माणसाचं , प्रामुख्यानं नोकऱ्यांसाठीचं आंदोलन होतं . इतर विषय त्याला नंतर चिकटत गेले . आज माझं आंदोलन हे उत्तर भारतीयांच्या महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक आणि राजकीय दादागिरी आणि गुंडगिरीविरुद्ध आहे . त्यांच्याकडे उत्तरेतून येणारे गुंड नेते , त्यांच्यामार्फत येणारे प्रचंड प्रमाणातले चलन , शस्त्रास्त्रं आहेत . इथे त्यांचं मग्रुर मनुष्यबळ वाढवण्याच्या प्रयत्नात ते असतात . भय्या टॅक्सीवाला , रिक्षावाला , मच्छीमार हा गरीब बिचारा उत्तरेतून आलेला असं चित्र भय्यांची लॉबी असलेली चॅनल्स उभी करतात . परंतु त्यांना रोजच्या जगण्यात एकेकटा स्थानिक मराठी माणूस भेटतो , त्यांच्याशी व्यवहार करतो , तेव्हा त्यांची खास उत्तरेतली मगुरी , महाराष्ट्राबद्दलचा त्यांचा द्वेष , उत्तरेतल्या गुंडांवरची त्यांची श्रद्धा या साऱ्याचं आपल्याला दर्शन होतं . त्यामुळे ' तो गरीब बिचारा पोटासाठी येतो ' अशा वाक्यात यांचं वर्णन होऊच शकत नाही .

राजकीय आणि सांस्कृतिक वर्चस्ववादाविरुद्धची ही आमची लढाई कितीतरी अवघड आहे . ती एकपदरी नाही , बहुपदरी आहे . महाराष्ट्रात आज राज्य कोणत्याही पक्षाचं असो . यूपी - बिहारमधले त्या त्या पक्षाचे नेते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला अतिशय मग्रुरीने ' व्हाया दिल्ली ' चेपू इच्छितात . हा महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेचा अपमान आहे . प . बंगाल , तामिळनाडू , आंध्र प्रदेश , ओरिसा , आसाम , केरळच्या बाबतीत हे होऊ शकत नाही . कारण तिथली जनता या भय्यांच्या गुंडगिरीबाबत अतिशय सावध आहे . स्वत : च्या सांस्कृतिक आणि भाषिक राजकीय अस्मितेविरुद्ध एकही शब्द ते सहन करत नाहीत . पण महाराष्ट्राची स्थिती तशी नाही .

आज मराठी माणूस समृद्ध आहे . त्याची आज जागतिक बाजारात पत आहे . दीपक घैसास , आशुतोष गोवारीकर , सचिन तेंडुलकर आणि यासारखे अनेक दिग्गज मराठी आज बाजारपेठेत वेगवेगळ्या क्षेत्रांत आपलं अस्तित्व दाखवत आहेत . आज परप्रांतीय मराठी माणसांकडे नोकऱ्या करत आहेत . हा बदल स्वागतार्ह आहे . पण राजकीय आणि सांस्कृतिक सावधपणाविना तो व्यर्थ जाऊ शकतो . या जाणिवेनेच मी आणि माझा पक्ष रस्त्यावर उतरलेलो आहोत .

एकेकाळी , म्हणजे बाळासाहेब पूर्णपणे कार्यरत असताना शिवसेना पक्ष मराठी माणसांचा पक्ष म्हणून ओळखला जायचा . तेव्हा तो माझाही पक्ष होता . तेव्हाही मी मराठी राजकीय वर्चस्वाचा मुद्दा लावून धरलाच होता . बिहारींविरुद्धचं माझं आंदोलन त्यावेळचंच . त्यामुळे माझ्या नव्या पक्षाच्या नव्या अजेंड्यात हा मुद्दा सामील झाला आहे असं अजिबातच नाही .

आता या भयानक परिस्थितीमुळे मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी आपलं राजकीय आयुष्य आणि सांस्कृतिक पुण्याई जुगारावर लावण्याचा निर्णय घेतला आहे . आपल्यातलेच काही मराठी मला अाणि माझ्या सहकाऱ्यांना शिव्याशाप देत आहेत . पण त्यांची मुलं - नातवंडं पुढे मला दुवा देतील . कविता , पुस्तकं , संस्कृती , अहिंसा , सहिष्णुता मलाही कळते . नवनिर्माणाच्या विकास कामांसाठी , विकासदृष्टीसाठी मी अकादमीच ( पुण्यात ) सुरू केलेली आहे . ज्या शिवाजी पार्कवर परवा स . पा . ने बिहारच्या आणि उत्तरेतल्या गुंडगिरीच्या भाषा केल्या , तिथे मीच मराठी काव्यवाचन आणि मराठी पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन केलं . त्यामुळे मराठी सुसंस्कृतपणा आणि सहिष्णुता मलाही कळते . पण मराठी भाषा टिकेल , तेव्हा मराठी कविता टिकेल . मराठी भाषा टिकेल , तेव्हा मराठी संस्कृती टिकेल . मराठी संस्कृती टिकेल , तेव्हा अस्सल मराठी राजकारण टिकेल . शेवटी रस्त्यावरचा संघर्ष कुणालाच प्रिय नसतो . पण आत्मरक्षणासाठी आणि संस्कृती टिकवण्यासाठी संघर्ष करावाच लागतो . तसं नसतं तर शेजाऱ्यांच्या सद्सदविवेकबुद्धीवर विश्वास ठेवून देशांनी सैन्य ठेवणं बंद केलं असतं आणि शेजारी राज्यांच्या प्रेमाखातर सर्व राज्यांत पोलिसदलही ठेवलं नसतं . संघर्ष करताना रक्त , घाम , अश्रू द्यावेच लागतात . पुढे ते संघर्ष यशस्वी झाल्यावर लोकप्रिय होतात !

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष सरकोझी आल्यावर स्वत : भारताचे पंतप्रधान शिखांच्या पगडीवर फ्रान्समध्ये असलेल्या बंदीवर रदबदली करतात . करुणानिधी मलेशियातल्या तामिळंासाठी मलेशियन सरकारशी वाग्युद्ध करतात आणि मग भारत सरकारला त्यात रदबदली करावी लागते . दमदमी टाकसाळमध्ये अकाली दलाच्या पुढाकाराने अतिरेकी जनेर्लसिंग भिंदनवाले याचा संत म्हणून फोटो लागतो . इंदिराजींच्या हत्येला कारणीभूत ठरणाऱ्या या संताबद्दल देशात अवाक्षरही निघत नाही . राजीव गांधींच्या हत्येला सरळ कारणीभूत असणाऱ्या एलटीटीईशी तामिळनाडूतील बहुतेक सर्व राजकीय पक्ष तामिळ मुद्द्यावर थेट संबंध ठेवून असतात . गांगुलीला टीममधून काढल्यावर पं . बंगालमधले कम्युनिस्ट बंगाली बनून आक्रमक होतात . हे सारं प्रांतवादी आणि सांस्कृतिक नाही ? मुंबईत चालणारे सर्व हिंदी चॅनल्स आणि त्यांचे पत्रकार महाराष्ट्राविरुद्ध विष ओकत यूपी - बिहारची वकिली करतात , ते प्रांतवादी नाहीत ? अमिताभ बच्चन स्वत : ला ' छोरा गंगा किनारेवाला ' मानतो . ते प्रांतवादी नाही का ? मी आणि माझ्या पक्षाने मराठी आणि महाराष्ट्राच्या अस्मिता यावर बोललं वा कृती केली की मी गुंड ठरतो ? हा मराठी माणसांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे .

अमिताभ बच्चननी त्यांच्यासाठी मरमर मरून काम करणाऱ्या सावंत नावाच्या मेकअपमनच्या मराठी , भोजपुरी चित्रपटांत दयेने काम केलं , तर ते जणू काही महाराष्ट्रावर उपकारच करताहेत , असं दाखवलं जातं . त्यांचा मेकअपमन जरी गांगुली , सुब्रम्हण्यम , मिश्रा कुणीही असता तरी ते असेच वागले नसते काय ? त्याच्यात त्यांचा महाराष्ट्राच्या अस्मितेशी संबंध काय ? ते तन , मन , धनाने उत्तर प्रदेशचेच आहेत . त्यांनी जे मिळवलं ते इथे , हेही सत्य नाही का ?

फक्त मी माझ्या महाराष्ट्रासाठी उभा राहिलो तर गुन्हेगार ठरतो ? राज्यघटनेत असं लिहिलंय का ?

मी इथे एकच पुन्हा सांगू इच्छितो . सर्व जग जरी विरोधात गेलं तरी मी आणि माझी संघटना मराठी भाषिक जनता , महाराष्ट्र संस्कृती , मराठी भाषा यासाठीच लढत राहू . यूपी - बिहारवाल्यांची महाराष्ट्रातली दादागिरी आणि गुंडगिरी आम्ही मोडून काढूच . मला महाराष्ट्राच्या मराठी जनतेला एवढंच सांगावंसं वाटतं की , जर मी तुमच्या मनातलंच बोलत असेन तर बघता काय ? सामील व्हा !

आपण विजयी होऊच ; कारण कोणताही कायदा , कोणतंही युद्ध , कोणताही माणूस पेटलेल्या मराठी मनांना थोपवू शकतच नाही . माझ्यावर विश्वास ठेवा . माझ्या मराठी माता - भगिनी - बांधवांनो , विजय तुमचाच आहे .

जय महाराष्ट्र !

Tuesday, January 8, 2008

पैशासाठी आपलेच घुसवताय परप्रांतियांनाः राज ठाकरे

पुण्याच्या आजूबाजूला ज्यांनी हजारो एकर जमीन घेतली आहे. त्यांना परप्रांतीय विद्यार्थ्यांचा ज्यांना पुळका सुटला आहे. आपल्या जमिनी विकण्यासाठी त्यांना उप-यांची मदत होते. शिक्षणासाठी आलेला राज्यात आलेला आपलं कायमचं बस्तान येथं बसतो. पैशासाठी आपलेच अशा परप्रांतियांना घुसवत असल्याचा टोला शरद पवार यांचं नाव न घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मारला.

मराठी विद्यार्थ्यांना शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशात प्राधान्य मिळावे यासाठी मनसेने गेल्या आठवड्यापासून ४६ शिक्षण संस्थाविरोधात आंदोलन पुकारले आहे. त्या विषयी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी राज ठाकरे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

आपल्या लोकांमुळे यापूर्वी मुंबईची वाट लागली आहे. आता पुणे, नाशिक आणि औरंगाबाद या शहरांची वाट लागणार आहे. जो तरुण शिक्षणासाठी महाराष्ट्रात येतो. त्याला कॅम्पस इंटरव्हूवद्वारे इथेच नोकरी मिळते. नोकरी मिळाल्यावर घर विकत घेऊन तो इथचं आपलं बस्तान मांडतो. हजारो एकरमध्ये उभारलेल्या आपल्या स्कीम खपवण्यासाठी या परप्रांतीयांचा उपयोग होतो. त्यामुळे याला सर्वस्वी आपले माणसे जबाबदार असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला.

परप्रांतीय विद्यार्थ्यांमुळे राज्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते, या मुद्याला हात घालत राज ठाकरे म्हणाले, शिक्षणाचा धंदा करायचा असेल तर काढा, महाराष्ट्राचं ग्लोबल टेंडरच काढा ! मागासलेल्या राज्यातली म्हणून जे विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी येतात ते ४० ते ५० लाख रुपये डोनेशन भरून प्रवेश घेतात. त्यावेळी हा पैसा कुठू आणला आहे. याची साधी चौकशीसुद्धा केली जात नाही. पाटणा आणि लखनौ मध्ये तर येथील शिक्षणाच्या धंद्याच्या पाट्या लावल्या जातात.

आता अॅडमिशनची लिस्ट जाहीर होण्याची वाट आम्ही पाहत आहोत. लिस्टमध्ये जर मराठी मुलांना प्राधान्य दिले नाही तर पुन्हा मनसे तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी या वेळी दिला.