Thursday, September 25, 2008

मराठी पाट्यांसाठी राजचा वॉर्निगबोर्ड

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील दुकानादारांना दुकानांवर मराठी पाट्या लावण्याच्या २८ ऑगस्टच्या डेड लाइनला केवळ सात दिवस शिल्लक असल्याचे फलक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दादर भागात लावले.
महाराष्ट्रातील विशेषतः मुंबईतील दुकानांवर मराठी पाट्या २८ ऑगस्टच्या आत लावाव्यात नाही तर वेगळ्या भाषेत सांगण्यात येईल, असा इशारा राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यांच्या या इशा-याची आठवण करून देण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दादर परिसरात 'फक्त सात दिवस शिल्लक' अशा आशयाचे फलक ठिकठिकाणी लावले आहे.
दुकानाच्या पाटीसाठी पाच हजाराचा खर्च येईल, पण मराठी पाटी लावली नाही तर मग परिणामांना दुकानदारांनी सामोरे जावे. पाटीसाठी खर्च करावा की दुकानासाठी हे दुकानदारांनीच ठरवावे, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.
नेत्याच्या चेतावणीची आठवण करून देण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आणि त्यांनी फलक लावण्याचे काम सुरू केले आहे.

Saturday, September 20, 2008

बच्चन कुटुंबियांविरुद्ध राज'बंदी' मागे

जया बच्चन यांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेले वादळ क्षमवण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी मागितलेल्या जाहीर माफीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बच्चन कुटुंबियांविरुद्धचे आंदोलन मागे घेतले आहे.

जया बच्चन यांनी आपल्या वक्तव्यावर स्वतः माफी मागणे आवश्यक होते. मात्र, कुटुंब प्रमुख म्हणून अमिताभ बच्चन यांनी महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची माफी मागितली. याचा आम्ही आदर करतो आणि बच्चन कुटुंबियाविरुद्धचे आंदोलन मनसेने मागे घेत आहेत, असे राज ठाकरे यांनी मनसेचे मुख्यालय असलेल्या राजगड येथे आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केले.

भाषणबंदीनंतरही राज ठाकरे यांनी अमिताभ बच्चन यांच्या माफीवर भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या संदर्भात भूमिका मांडण्यासाठी त्यांनी मुंबई पोलिस आयुक्त हसन गफूर यांच्याकडे पत्रकार परिषदेची परवानगी मागितली होती. मात्र, चौकशीनंतर परवानगी देण्यात येईल असे सांगितले. त्यानुसार राज ठाकरे यांनी शिवाजीपार्क स्टेशनमध्ये अर्ज करून पत्रकार परिषदेची मागणी केली होती.

अमिताभ बच्चन यांनी मागितलेली माफी ही मराठी माणसाच्या एकजूटीचा विजय आहे. मराठी माणूस एकत्र आल्यावर काय करू शकतो याचं हे छोटंसं उदाहरण आता जगासमोर आहे. अमिताभ बच्चन हे ज्येष्ठ कलाकार आहे. अमिताभ बच्चन, लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांना सीमा नाहीत. यांनी आपल्या राज्यांच्या सीमेत बांधून घेवू नये, असा आग्रहही राज ठाकरे यांनी यावेळी केला.

अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगवर जाहीर माफी मागितल्यानंतरही मनसेच्या कार्यकर्त्यांनी जूहूचे पीव्हीआर सिनेमागृह तोडले असे वृत्त प्रसिद्ध झाले. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, ब्लॉग नावाची गोष्ट म्हणजे वर्तमानपत्र किंवा न्यूज चॅनल नाही. सकाळी उठल्यावर माणूस अमिताभ यांचा ब्लॉग वाचणार असे होत नाही. अमिताभ बच्चन यांनी काल सायंकाळी पत्रकार परिषद घेतल्यानंतर सर्व गोष्टी क्लीअर झाल्या. त्यामुळे आता मनसेने सुरू केलेले आंदोलन आम्ही मागे घेत आहोत. कार्यकर्त्यांना शांतता राखावी असे आवाहन त्यांनी यावेळी केली.

Wednesday, September 17, 2008

पाट्या महाग की, दुकाने ते ठरवा!

मराठी भाषेतल्या पाट्या महागड्या असल्याचा युक्तिवाद मॅकडोनाल्डसारख्या कंपन्या करतात. पण पाट्या महागड्या की, दुकाने महागडी याचा विचार दुकानदारांनी करावा. मराठी भाषेत पाट्या लावल्या नाहीत, तर त्यांचे परिणाम भोगायची तयारी ठेवा, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी दिला. मराठी भाषेवर आक्षेप असेल तर तो महाराष्ट्रदोह ठरेल, असे ते म्हणाले.

मराठीत पाट्या लावण्यासाठी मनसेेने दिलेली मुदत २८ ऑगस्टला संपत आहे. मराठी पाट्यांसाठी दिलेली मुदत व भोईवाड्यातील गावठाणाच्या विकासाच्या मुद्यावर राज यांनी पालिका आयुक्त डॉ. जयराज फाटक यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत आमदार बाळा नांदगावकर, मंगेश सांगळे, अरविंद गावडे होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राज म्हणाले की, मराठीतल्या पाट्या म्हणजे दुकानाच्या नावाचा अनुवाद नाही, असे स्पष्ट करताना ते म्हणाले की, देवनारी लिपीमध्ये पाट्या असल्या पाहिजेत. भाजपचे सरकार असलेल्या कर्नाटकमध्ये कन्नड येत नाही म्हणून मराठी आमदाराला मंत्रिपदापासून लांब ठेवले जाते. भाषेबद्दलचा प्रश्न इतर राज्यात विचारला जात नाही. चेन्नईमध्ये बीएमडब्ल्यू कपंनीत आलेल्या परदेशी तंत्रज्ञाना तामिळ भाषा शिकावी लागते. इतर राज्यांत भाषेच्या प्रश्नावर कोणीही ब्र काढत नाही. मराठी सोडून अन्य भाषांना सामावून घेण्याचा मक्ता काय महाराष्ट्रानेच घेतला आहे काय, असा सवाल त्यांनी केला.

Monday, September 15, 2008

पैशासाठी आपलेच घुसवताय परप्रांतियांनाः राज ठाकरे

पुण्याच्या आजूबाजूला ज्यांनी हजारो एकर जमीन घेतली आहे. त्यांना परप्रांतीय विद्यार्थ्यांचा ज्यांना पुळका सुटला आहे. आपल्या जमिनी विकण्यासाठी त्यांना उप-यांची मदत होते. शिक्षणासाठी आलेला राज्यात आलेला आपलं कायमचं बस्तान येथं बसतो. पैशासाठी आपलेच अशा परप्रांतियांना घुसवत असल्याचा टोला शरद पवार यांचं नाव न घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मारला.

मराठी विद्यार्थ्यांना शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशात प्राधान्य मिळावे यासाठी मनसेने गेल्या आठवड्यापासून ४६ शिक्षण संस्थाविरोधात आंदोलन पुकारले आहे. त्या विषयी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी राज ठाकरे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

आपल्या लोकांमुळे यापूर्वी मुंबईची वाट लागली आहे. आता पुणे, नाशिक आणि औरंगाबाद या शहरांची वाट लागणार आहे. जो तरुण शिक्षणासाठी महाराष्ट्रात येतो. त्याला कॅम्पस इंटरव्हूवद्वारे इथेच नोकरी मिळते. नोकरी मिळाल्यावर घर विकत घेऊन तो इथचं आपलं बस्तान मांडतो. हजारो एकरमध्ये उभारलेल्या आपल्या स्कीम खपवण्यासाठी या परप्रांतीयांचा उपयोग होतो. त्यामुळे याला सर्वस्वी आपले माणसे जबाबदार असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला.

परप्रांतीय विद्यार्थ्यांमुळे राज्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते, या मुद्याला हात घालत राज ठाकरे म्हणाले, शिक्षणाचा धंदा करायचा असेल तर काढा, महाराष्ट्राचं ग्लोबल टेंडरच काढा ! मागासलेल्या राज्यातली म्हणून जे विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी येतात ते ४० ते ५० लाख रुपये डोनेशन भरून प्रवेश घेतात. त्यावेळी हा पैसा कुठू आणला आहे. याची साधी चौकशीसुद्धा केली जात नाही. पाटणा आणि लखनौ मध्ये तर येथील शिक्षणाच्या धंद्याच्या पाट्या लावल्या जातात.

आता अॅडमिशनची लिस्ट जाहीर होण्याची वाट आम्ही पाहत आहोत. लिस्टमध्ये जर मराठी मुलांना प्राधान्य दिले नाही तर पुन्हा मनसे तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

पुण्याच्या एमआयटी कॉलेजमध्ये मनसेचा राडा

परप्रांतीय विद्यार्थांच्या मुद्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुण्याच्या पौड रोडवर असलेल्या एमआयटी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये राडा केला आहे. स्थानिक मराठी विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक प्रवेश नाकारला जात असल्यामुळे हा पर्याय वापरावा लागला असे मनसेचे म्हणणे आहे.

महाराष्ट्र सरकारने स्थानिक विद्यार्थ्यांना प्रवेश देताना प्राधान्य द्या असे सांगितले असतानाही एमआयटी स्थानिक विद्यार्थ्यांना प्रवेश देणे टाळते. यासंदर्भात वारंवर निवेदने देऊनही एमआयटीचे प्रशासन त्याकडे लक्ष देत नव्हते. असा आरोप करत मनसेच्या कार्यकर्त्यांना एमआयटीच्या आवारात दगडफेक केली. तसेच संस्थेचे संचालक मंगेश कराड यांच्या केबिनमध्ये घुसून तिथेही बरीच तोडफोड करण्यात आली.

राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या सभेमध्ये परंप्रातीय विद्यार्थ्यांचा मुद्दा उचलून धरला होता. स्थानिक विद्यार्थ्यांना प्रवेश देताना डावलल्यास कॉलेज व्यवस्थापनाला त्याचे परिणाम भोगावे लागतील , असा इशाराही त्यांनी त्यावेळी दिला होता. तरीही एमआयटी कॉलेज मोठ्या प्रमाणावर राज्याबाहेरुन आलेल्यांना प्रवेश देत होते. असे मनसेच्या नेत्यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

या प्रवेश प्रकाराबाबत मनसेने कॉलेज व्यवस्थापनाकडे माहिती मागितली होती. तसेच राज्याबाहेरच्या मुलांना प्रवेश देणे थांबवावे अशी निवेदनही दिली होती. मात्र त्याकडे कॉलेज व्यवस्थापनाने दुर्लक्ष केले म्हणून अखेर कॉलेज प्रशाननाला जाग आणण्यासाठी हा मार्ग निवडावा लागला , एमआयटीचे व्यवस्थापन पैसे घेऊन परप्रांतातील मुलांना प्रवेश देते आणि राज्यातील लायक विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारत आहे , असा आरोपही मनसेने केला आहे.

११ जुलैनंतर काय

११ जुलैनंतर काय होतंय बघा!- राज
मुंबई,
मटा ऑनलाइन वृत्त

‘ आज मी शांत आहे, असं अनेकांना वाटत असेल... पण ही वादळापूर्वीची शांतता आहे... ११ जुलैनंतर काय होतंय बघा... ’ असा गर्भित इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.

मुंबईत बोरिवलीला आयोजित एका कार्यक्रमासाठी राज ठाकरे उपस्थित होते, तेव्हा त्यांचं फक्त आठ मिनिटांचं भाषण झालं. पण त्यातून त्यांनी पुढच्या राड्याचेच संकेत दिले आहेत.

राज यांनी अपेक्षेप्रमाणे मराठीचा मुद्दा उचलला. उत्तर भारतीयांची खुमखुमी अजून गेलेली नाही. त्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवावी लागेल, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. राज ठाकरे शांत झाला, नुसतं बोलून काय होणार, कृती केली पाहिजे, असं अनेकजण बोलत आहेत. पण ही वादळापूर्वीची शांतता आहे. ११ जुलैनंतर बरंच काही होणार आहे, त्यामुळे तोपर्यंत वाट पाहा, असं त्यांनी सूचित केलं.

असाच इशारा राज ठाकरेंनी ३ मेच्या शिवाजी पार्कच्या सभेपूर्वी दिला होता. त्या सभेनंतर मनसे कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांना सळो की पळो करून सोडलं होतं. त्यामुळे आता ११ जुलैनंतर राज काय करणार, याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.

मुखपत्र काढायचंय !
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं मुखपत्र काढण्याचा विचारही राज यांनी यावेळी बोलून दाखवला. मुखपत्र काढायची तयारी सुरू केल्याचंही त्यांनी बोलता बोलता सांगितलं. मुखपत्राच्या माध्यमातून रोजच्या रोज कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचणं शक्य होईल, असा त्यांचा विचार आहे.

Friday, September 12, 2008

स्वातंत्र्यदिनापासून सदस्यनोंदणी

येत्या १५ ऑगस्टपासून एक महिना राज्यभर मनसेची सदस्यनोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठीच्या फॉर्मचं वितरण आज कार्यकर्त्यांना करण्यात आलं. ज्याला मनसेमध्ये यायचंय त्याला येऊ द्या, त्यातल्या गुणदोषांसह स्वीकारा, असं आवाहन राज यांनी कार्यकर्त्यांना केलं.